दिनांक 3 मे सोमवार रोजी एम एस बी ई कार्यालयाच्या परिसरात भव्य असा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ती (अधीक्षक अभियंता लातूर) माने साहेब तसेच (उदगीर कार्यकारी अभियंता) जाधव साहेब तसेच (उपअभियंता) देशमुख साहेब. डॉक्टर शेख असगर साहेब हे मंचावर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात रमजान,रोजा, कुराण या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टर असगर साहेबांनी या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले
तसेच माने साहेब यांनी सुद्धा अशा कार्यक्रमाची नितांत गरज असते हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले
तसेच जाधव साहेब यांनीही या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत रमजान ईद च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इसाक यांनी केले व तसेच आभार अखंड रहीम यांनी मानले.
इफ्तारपार्टीत सर्व बांधवांनी एकत्र बसून इफ्तारच आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली